श्री. सुनील तटकरे यांच्याविषयी थोडेसे
दोन दशकांहून अधिक काळ ते महाष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. यापूर्वी तटकरे साहेबांनी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री ( ऑक्टोबर १९९९ ते २००४ ), अत्र व नागरी पुरवठा, साहक संरक्षण विभागाचे मंत्री (२००४ ते २००८ ) आणि उर्जा मंत्री (२००८ ते २००९ ) म्हणून यशस्वीपणे काम केला आहे. तत्त्वांशी प्रामाणिक राहणारे तटकरे साहेब फ्रखर बुद्धिवादी नेते म्हणून ओळखले जातात.समर्थ आणि बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेचे ते कट्टर समर्थक आहेत.
सुरुवातीचा कालखंड
श्री सुनील तटकरे यांचा जन्म १० जुलै १९५५ रोजी रोहा तालुक्यातील कोलाड या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील दत्तात्रय तटकरे यांची परिस्थिती बेताचीच होती. अशा वातावरणात वाढल्याने सुनील तटकरे यांची जडणघडनही वेगळीच झाली. जात, धर्म, पंथ याचा विचार न करता सर्वांशी विनम्रतेने वागायचे व सदैव सर्वांच्या मगतीला धावून जायचे. हेच त्यांनी आपल्या जीवनाचे सूत्र मानले.
शालेय जीवनात एक अत्यंत हुशार विध्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता. प्रत्येक वर्षी शाळेतील त्यांचा पहिला क्रमांक कधी चुकला नाही. आपल्या मुलाने डॉक्टर होवून जनतेची सेवा करावी, त्यांच्या वडीलांची खूप इच्छा होती. परंतु सुनील च्या डोक्यात वेगळेच चक्र सुरु होते. डॉक्टर होऊन कागदी चीठ्यांवर औषथे लिहून दिल्याने जनसेवा होऊ शकत नाही हे सुनीलला तेव्हाच उमगले होते. यापेक्षा आपल्या भागातील लोकांचे राहणीमान कसे उंचावेल त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता कशी करता येईल याचा हायसा सुनीलने घेतला. या दिनेश काय करता येईल याचा शोध ते घेत राहील.
दत्तात्रय तटकरे हे राजकीय कामासाठी प्रचंड दौरे करीत. ज्यावेळी सुनील सदैव त्यांच्या समवेत असत. बर्याचदा तेच मोतोर चालवीत असत. या पिता-पुत्रांमधील संबंध निराळेच होते. जनसेवेच्या नवनव्या कल्पना सुनील तटकरे यांच्या मनात घोळत असताना अचानक वडिलांचे दु:खद निधन झाले. परिणामी कुंटुंबाची सर्व जबाबदारी सुनीलवर आली. महाविध्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी बांधकाम व्यवसायात पाउल टाकले.
Links to Visit
प्रसिद्धी पत्रक