श्री. सुनील तटकरे राजकीय प्रवास

picture सुनील तटकरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते असून २००९ मध्ये ते श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. त्या अगोदर १० डिसेंबर २००८ रोजी राज्याच्या उर्जामंत्री पदाची जवाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. राज्यात सर्वत्र वीज टंचाई समस्या असल्याने ग्रामीण जनता अस्वस्त होती. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे एका दिवसात हा प्रशन सुटणारा नव्हता. परंतु हे कठीण आव्हान तटकरे साहेबांनी स्वीकारली. खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर अगोदर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून माहिती घेतली. नंतर या क्षेत्रातील जाणकारांबरोबर बैठका घेतल्या. खासगी क्षेत्रातून वीज नेर्मीती व्हावी, यासाठी बड्या उद्योगपतींशी विचार विनिमय केला. २०१३ पर्यंत राज्य लोडशेदिंग मुक्त व्हावे या दृष्टीने एक ब्लू प्रिंट तयार केली. आणखी दोन वर्षांनी परिस्थिती खूपच बदलेल. त्यापूर्वी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री म्हणून काम करतांना तटकरे साहेबांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. या विभागातील भ्रष्टाचार मोडून काढून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गोरगरीबांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला. नगरविकास हे मंत्रिमंडळातील महत्वाचे खाते असून त्याची जवाबदारी मुख्यमंत्र्यानकडेच असते. या महत्वाच्या विभागाचे राज्यमंत्रीपध हे

जन्म: कोलाड, ता. रोहा, जी. रायगड येथे १० जुलै १९५५ रोजी झाला

व्यवसाय: गेली वीसहून अधिक वर्षे ते राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्रासारख्या क्षेत्रातील प्रगत राज्याचा अर्थमंत्री हा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी काही काळ ते बांधकाम व्यवसायात होते.

शिक्षण: इंटर सायन्स, आंबेडकर महाविध्यालय, महाड.
राजकीय क्षेत्रातील म्हत्वाचे टप्पे :

१९८४ ते १९९२ रायगड जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष आणी रोह तालुका कॉंग्रेस समितीचे सचीव.

२१ मार्च १९९२ - १९९५ या काळात रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष.

१९९५ मध्ये पहिल्यांदाच विधानसभेवर निवड.

या निवडणुकीत कोकणातील सर्व कॉंग्रेस उमेदवार पराभूत झाले. फक्त सुनील तटकरे हेच एकमेव कॉंग्रेसचे आमदार म्हणून कोकणात विजयी झाले.

ऑक्टोबर १९९९ व जानेवारी २००३ मध्ये नगरविकास राज्यमंत्री होते.

२००४ ते २००८ या काळात ते नागरी पुरवठा खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.

२००८ ते २००९ या कालावधीत महत्वाच्या खात्याची जवाबदारी सांभाळली.

२००९ मध्ये तटकरे यांच्या आजवरच्या कामगारीरीची दखल घेयून राज्याचे अर्थमंत्रीपध देण्यात आले.


 

Links to Visit

प्रसिद्धी पत्रक

४ एप्रिल २०१०

बेदाण्याचा व्हॅट रद्द होणार : शरद पवारांची अर्थमंत्र्यांना सूचना सभापती प्रकाश जमदाडे यांची माहिती

सांगली, दि. ४ (प्रतिनिधी) : बेदाण्यावर लावण्यात आलेला पाच टक्के व्हॅट रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अर्थमंत्री सुनील तटकरे यांना तशी सूचना दिली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जमदाडे आज नेत्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळासह मुंबईला रवाना झाले.

Read More »

४ एप्रिल २०१०

बेदाण्याचा व्हॅट रद्द होणार : शरद पवारांची अर्थमंत्र्यांना सूचना सभापती प्रकाश जमदाडे यांची माहिती

सांगली, दि. ४ (प्रतिनिधी) : बेदाण्यावर लावण्यात आलेला पाच टक्के व्हॅट रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी अर्थमंत्री सुनील तटकरे यांना तशी सूचना दिली असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, जमदाडे आज नेत्यांना भेटण्यासाठी शिष्टमंडळासह मुंबईला रवाना झाले.

Read More »

३ एप्रिल २०१०

एक कोटी २२ लाख रुपयांच्या नियंत्रित शिधाजिन्नसाचा अपहार
शिधावाटप नियंत्रकांकडून चौकशी समिती नेमण्यास तब्बल आठ महिने विलंब

घाटकोपर भागातील शिधावाटप कार्यालय क्रमांक ३४-ई अंतर्गत ११ शिधावाटप दुकानांना १६३८ इतक्या बोगस शिधापत्रिका संलग्न करून रॉकेल व धान्यादी वस्तूंचा सुमारे एक कोटी २२ लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी मंत्रालयातून आदेश जाऊनही शिधावाटप नियंत्रकांनी चौकशी समिती नेमण्यासाठी तब्बल आठ महिने विलंब केल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणी संबंधित शिधावाटप अधिकाऱ्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही किंवा कोणाला बळीचा बकराही बनविण्यात आलेले नाही ही देखील आश्चर्याची बाब मानली जात आहे.

Read More »

३ एप्रिल २०१०

रेशनकार्डधारकांसाठी शुल्ककाष्ठ कायम!

रेशनकार्डांची वैधता तपासण्यासाठी तासनतास रांगा लावून सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असतानाच राज्यकर्त्यांच्या डोक्यात आलेल्या नव्या कल्पनेमुळे पुन्हा रांगा लावण्याचे दिव्य रेशनकार्डधारकांच्या नशिबी येणार आहे. संगणकीय रेशनकार्डे देण्याचे काम गेली अनेक वर्षे प्रलंबित असताना आता बायोमेट्रिक रेशनकार्डे देण्याचे घाटत आहे. यासाठी रेशनकार्डांवर नावे असलेल्या सर्वांच्या बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत.

Read More »

२ एप्रिल २०१०

रत्नागिरीला ‘ब’ पर्यटन स्थळाचा दर्जा

अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी सादर केलेल्या सन २०१०-११च्या अर्थसंकल्पात कोकणाच्या पदरात भरभरून माप टाकल्याने, आता या मागास व गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास जलदगतीने होणार आहे, असा विश्वास रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी काल केला आहे.

Read More »

२९ मार्च २०१०

अर्थमंत्री सुनील तटकरे यांची वेबसाइट

रायगडसह राज्यातील जनतेला संपर्क साधता यावा, यासाठी अर्थमंत्री सुनील तटकरे यांची स्वत:ची वेबसाइट बनवली आहे. त्या वेबसाइटचे तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Read More »

२८ मार्च २०१०

धक्कादायक निकाल?
कोकणातील पर्यटन, शिक्षण, पायाभूत सुविधांसाठी अनेक योजनांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात अर्थमंत्री सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांना यश आले असले तरी कोकण स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उद्या रविवारी जाहीर होणा - या निकालाचा कौल अर्थमंत्र्यांच्या बाजूने लागणार की नाही याविषयी कोकणातील तीन जिल्ह्यांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read More »

२८ मार्च २०१०

श्री. अनिल तटकरे विजयी

Read More »

२८ मार्च २०१०


Read More »